मुंबई प्रतिनिधी :
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत आवश्यक तयारी सुरू केली असून, मतदार यादी पुनर्रचना आणि आरक्षण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांत ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका तसेच महानगरपालिकांच्या निवडणुकांचे वेळापत्रक येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चळवळ सुरू झाली असून, पक्षांतर्गत बैठकांचा आणि उमेदवारी चर्चांचा सिलसिला सुरू झाला आहे.
राज्याच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे या निवडणुकांमध्ये सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, आगामी निवडणुका राज्यातील राजकीय समीकरणांवर मोठा प्रभाव टाकतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
